बुडते हे जन

आज बातमी पाहिली की यवतमाळमध्ये काही काश्मीरी तरूणांना मारहाण झाली. सामाजिक माध्यमांवरून जे विष ओकलं जातंय त्याला सर्वसामान्य माणूस बळी पडतोय. मध्यंतरी ईशान्य भारतीय तरूणांवर बंगरूळूत आणि देशाच्या अन्य भागांमध्ये हल्ले झाले. मुंबईतही उत्तर भारतीयांना मारहाण करण्यात आली होती. कोण आहेत हे सगळे? तुमच्या आमच्यासारखेच चांगलं शिक्षण घेता यावं, ते शांततापूर्ण वातावरणात घेता यावं, आयुष्यमानाचा स्तर उंचावता यावा यासाठी धडपडणारे. त्यासाठी कष्ट करणारे. भारतीय लोकही जगाच्या कानाकोपऱ्यात त्यांच्यासारखेच जातात. हेच सगळं करायला. काही ठिकाणी त्यांनाही वर्णविद्वेषाला बळी पडावं लागतं. त्यावेळी सगळेच हळहळतात. मग आपल्याच देशवासीयांना हे सहन करायला लागतं त्यावेळी ही सहवेदना कुठे जाते?

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s